नवी मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासुन मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यात पुढील ३-४ तासांमध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी ३० ते ४० किमी प्रतितास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल. तसेच बाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.