मॅक्समराठी न्यूज नेटवर्क – नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेतलेला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या अनेक भागांत हवामान कोरडे राहणार आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.