मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – राज्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान आता पुढील एक दोन दिवसात महाराष्ट्रातून पूर्णपणे मान्सून गायब होणार आहे. असे असले तरी पुढील चोवीस तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.