मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – नवी मुंबई : राज्यात आता पाल्या भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. अवकाळी पाऊस आणि आवक घटल्याचा परिणाम भाज्यांच्या दरवाढीवर झाला आहे. राज्यातील सर्वात महाग कोथिंबीर नागपुरात विकली जातेय. किरकोळ बाजारात कोथिंबीर 400 रुपये किलोने विकली जात आहे. तर मिरचीचे भाव 200 रुपये किलो झाले आहेत. तसेच टोमॅटो 80 ते 100 रूपये किलो दराने विकले जात आहे. कांदा 50-60 रूपये किलो झाला आहे.