मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – महाराष्ट्रात आजपासून जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज शनिवार (16 ते 18 ऑक्टोबर) 3 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये 16 ऑक्टोबरला नागपूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशातल्या एकूण 14 राज्यात पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.