मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी शहर ग्रामीण जिल्ह्यात मुसळधार व अतिवृष्टीच्या पावसाने, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (एनडीआरएफ) निकषातील देय मदतीपेक्षाही अधिक म्हणजेच एकूण ५५५.३९ कोटींची आर्थिक मदत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे.जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी औरंगाबाद सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे.