मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – राज्यात पावसाने गेल्या आठवड्याभरापासून उघडीप घेतली आहे. त्यातच आता हवामान खात्याने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. 1, 2 नोव्हेंबरला हवामान खात्याने दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिलाय. सोमवारी रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला असून या ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.