मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास महत्त्वाचे आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढच्या काही तासात नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, ठाणे, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दहा जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.